Car Accident Latur : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात शनिवारी एका महामार्गावर भरधाव कार महामार्गावरील एका छोट्या हॉटेलात घुसल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गावर औसा येथे सकाळी हा अपघात झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षकाने दिली.
सहा जण हैदराबादहून कारमधून लातूरला जात असताना समोर आलेल्या रिक्षाला चुकवण्याच्या नादात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलात घुसली. सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार या हॉटेलवर आदळताना दिसत आहे.
या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे वाजिद खान पठाण आणि सोहेल शेख तसेच हॉटेलात बसलेला एक इसम ठार झाला, या अपघातात कारमधील इतर तीन प्रवासी जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.मृत व्यक्ती हे लातूरचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.