पिंपरी – केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात राबविल्या जाणाऱ्या तीनही प्रकल्पांकरिता असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेच्या वतीने चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे तीन गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याकरिता नागरिकांकडून 14 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे गावी स्थलांतर झाले आहे. गावाहून परतलेल्या नागरिकांकडे या प्रकल्पाकरिता अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. कोविडमुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही कागदपत्रे काढण्यात अडचणी येत आहेत.