चेन्नई :- अण्णा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूत सध्या दोन गट कार्यरत आहेत. यातील एक गट पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या दोन्ही गटांना एकत्र आणून जयललितांचा राजकीय वारसा भक्कम करण्याचा निर्धार दिवंगत जयललितांच्या निकटच्या सहकारी शशिकला यांनी व्यक्त केला आहे.
जयललितांच्या स्मृती दिनानिमीत्त त्यांनी त्यांच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त करीत राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.
उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा जादाची संपत्ती जमा केल्याच्या कारणावरून शशिकला यांना कारावासाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून त्या परत आल्या असल्या तरी त्या राजकारणात मात्र सक्रिय झालेल्या दिसल्या नव्हत्या. त्यांनी राजकारण संन्यासच घेतल्या सारखी स्थिती होती. पण आता अद्रमुकच्या दोन गटांना एकत्र आणण्याच्या हालचाली त्यांनी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, येत्या लोकसभा निवडणुकीपुर्वी आम्ही हे दोन्ही गट एकत्र करू आणि लोकसभेच्या राज्यातील निवडणुका जिंकू. अण्णा द्रमुक पक्षाचे सरचिटणीसपद मिळवण्यासाठीही त्या उत्सुक असल्याचे सांगितले जाते.