कोटा – राजस्थानातील कोटा शहरातील बालमृत्यू प्रकरणी भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारला चांगलंच कात्रीत पकडलं आहे. दरम्यान या प्रकरणी आज राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी भाजपवर पलटवार केला असून ‘कोटा येथील बालमृत्यूचे राजकारण करून भाजप देशभरामध्ये सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यविरोधातील निदर्शनांवरून लक्ष हटवण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करत आहे.’ असा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना त्यांनी, “पंतप्रधानांच्या निर्देशांवरून भाजपकडून कोटा येथील बालमृत्यूचं राजकारण करण्यात येत असून यामागे देशभरामध्ये सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून लक्ष विचलित करण्याचं राजकारण आहे. २०१५, २०१६ व २०१७ मध्ये राज्यात भाजप सत्तेत असताना रुग्णालय प्रशासनाकडून निधीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा निधी का दिला नाही?” असा प्रश्न उपस्थित केला.
तत्पूर्वी, राजस्थानातील कोटा शहरामधील जे के लोन रुग्णालयामध्ये अवघ्या ४८ तासांमध्ये १० शिशुंचा मृत्यू झाल्याने देशभरामध्ये एकाच खळबळ उडाली होती. या दुर्दैवी घटनेची नोंद घेताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सदर घटनेची संवेदनशीलतेने नोंद घ्यावी असं म्हंटल होतं.
Raghu Sharma,Rajasthan Health Min: BJP’s politics over death of children in Kota is directed by PMO,as they don’t have anything else to cover over up the protests over CAA. In 2015,2016&2017 when BJP was in power,hospital authority had sought funds,why wasn’t money released then? pic.twitter.com/SfG9tLzglR
— ANI (@ANI) January 1, 2020