नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात हिंसक झालेल्या हिंसक प्रदर्शनात आम आदमी पार्टी (आप) आणि कॉंग्रेसला जिम्मेदार ठरवलं आहे.
जावडेकर म्हणाले, “आप आणि कॉंग्रेसने सीएएच्या मुद्दय़ावरून दिल्लीत हिंसाचार पसरविला. आपचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दंगल चिथावणीखोर विधान केले. या दंगलीमुळे दिल्लीतील वातावरण बिघडले आहे.”
“आता राजधानीतील लोकांना आप आणि काँग्रेसचे राजकारण समजले आहे. सर्वांना माहिती आहे की, सीएए कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आप आणि कॉंग्रेस कितीही प्रयत्न केले तरी आम्ही दिल्लीचे वातावरण खराब होऊ देणार नाही. ”
डिसेंबरमध्ये सीएएविरोधात हिंसाचार आणि जाळपोळझाली होती. वाहनांना आग लावण्यात आल्या होत्या. ईशान्य भारतातातही त्याचे पडसाद उमटले होते.