नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही मिनिटांतच अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या , अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारताची ताकद ओळखली आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.
तसेच अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचे सात प्राधान्य म्हणजे सप्तर्षी सांगितले. यात सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र हे सप्तर्षी असल्याचे त्यांनी सांगितले.
PM Vishwa Karma Kaushal Samman-package of assistance for traditional artisans and craftspeople has been conceptualised, will enable them to improve quality, scale & reach of their products, integrating with MSME value chain: FM Nirmala Sitharaman in Parliament#UnionBudget2023 pic.twitter.com/dzHAXHF9n2
— ANI (@ANI) February 1, 2023
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.