अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही मिनिटांतच अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपलं पाचव बजेट सादर करतायत. संसेदत अर्थमंत्र्यांच बजेटवरील भाषण सुरु आहे. अमृतकाळातील हे पहिलं बजेट असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढील 25 वर्षांसाठी बजेट ब्लू प्रिंट तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जगात मंदी असूनही, जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्के आहे.
Indian economy on the right track, and heading towards a bright future: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget2023 https://t.co/sXnfHSDRsP
— ANI (@ANI) February 1, 2023
भारताची ताकद जगाने ओळखलीसमाजातील सर्व घटकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत केले आहे. आर्थिक प्रगतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांचे भाषण सुरु असताना विरोधकांनी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.