सिंधुदुर्गनगरी – पुढच्या एक वर्षात जिल्ह्यात सबमरीन पर्यटन आणू असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. वेंगुर्ला येथील मधूसुदन कालेलकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.
आरमार इस्डाचे मॉडेल क्वेटिक टुरिझम सिंधुदुर्गमुळे राज्यात सुरु झाले आहे. पुढील पाच वर्षात इतर राज्यातील पर्यटन राज्यात खेचू शकू. कोकणाला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. शाश्वत विकास कसा करायचा यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
मुंबईच्या विकासात कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. कोकणी माणसासाठी शाश्वत विकासाचे मॉडेल राबवायचे आहे. गेली 25 वर्षे प्रलंबित असणारी पुढील तीन वर्षात दोन्ही मोठी हॉटेल पूर्ण होतील. सिंधुरत्न योजनेला पुढील एक ते दीड वर्षात यश येईल. अशी ग्वाहीही त्यांनी शेवटी दिली.