नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल ९ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधीच मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा समावेश आहे.
मागील दीड वर्षापासून संपूर्ण देश करोना संसर्गाशी लढा देत आहेत. या कालावधीत आरोग्यमंत्र्यांचं कामकाज सर्वाधिक महत्त्वपूर्ण होतं. मात्र नव्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्र्यांनाच डच्चू देण्यात आला आहे. करोना काळात आरोग्य मंत्रालयाच्या ढिसाळ कामामुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याचा फटका डॉ. हर्ष वर्धन यांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आरोग्यमंत्री डॉ. हर्श वर्धन यांच्यासह बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet, ahead of #CabinetReshuffle
(File pic) pic.twitter.com/Iv63Isu7UK
— ANI (@ANI) July 7, 2021
कॅबिनेट विस्तारापूर्वी थावर चंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटवून कर्नाटकचं राज्यपाल पद देण्यात आलं. ते सामाजिक न्याय मंत्री होते. त्याशिवाय गहलोत यांच्याकडे राज्यसभा सभागृहाचं सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचंही पद होते.