पावसाळ्यात किचन दररोज स्वच्छ करावे लागते. किचनमधील वापरातील प्रत्येक वस्तू वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसून जागच्या जागी ठेवणे गरजेचे असते.
किचन स्वच्छ ठेवण्याकडे सर्वांचाच कल असतो पण किचनओटा आणि हात पुसण्याचे फडके बहुतेक वेळा अस्वच्छ असतात. तसेच भांडी घासणीही भांडे घासल्यानंतर तशीच ठेवली जाते. त्यामुळे किचनमध्ये कुबट वास येतो. (kitchen tips in marathi)
बऱ्याच वेळा फक्त नळाखाली धरून फडके सुकायला टाकली जातात. तेही योग्य नाही. अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर न घासता ठेवू नका. स्वयंपाकाची भांडी उशिराने घासली जाणार असतील तर ती तात्पुरती विसळून ठेवा. घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून ठेवा.
भाज्या चिरल्यानंतर वापरलेला चाकू, विळा तसाच ठेवून दिला जातो. मात्र तेही स्वच्छ धुणे गरजेचे असते. सर्व प्रकारचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कोरडे झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा.
पावसाळ्यात बॅक्टेरीया वाढण्याचा धोका असतो पण किचनसोबतच या वस्तूही स्वच्छ असतील तर तुमचे किचन हेल्दी राहील. कारण किचनच्या मार्फेतच बॅक्टेरीया तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो आणि तुम्हाला आजारी पाडू शकतो.