मुंबई – ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला होता. मात्र, 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर अखेर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, अश्यातच आता पुन्हा एकदा पत्राचाळ प्रकरण चर्चेत असल्याचं दिसून आलं आहे. ईडीनं याप्रकरणी मोठी कारवाई केली असून यातील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार,
ED attaches two immovable properties worth Rs 31.50 Crores situated at North Goa of Rakesh Kumar Wadhawan and Sarang Kumar Wadhawan – Directors of Guru Ashish Construction Pvt Ltd in the Patra Chawl redevelopment Case. pic.twitter.com/RAOkXIFyUz
— ANI (@ANI) April 3, 2023
पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. यांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती अर्थात इमारती ईडीनं जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते नवीन खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे आहे.