वाई तालुक्यातील बळीराजावर दुबार पेरणीचे संकट
वाई (प्रतिनिधी) – वाई तालुक्यात अनेक शेकऱ्यांनी विविध कंपन्याचे प्रामाणित बियाणाची पेरणी केली होती, पण तालुक्यात शेकडो एकरवर उगवणीला मार बसल्याने निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुबारा पेरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून निकृष्ट बियाणांची विक्री करणाऱ्या संबंधित कंपन्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
जूनच्या सुरुवातीस पडलेल्या समाधानकारक अवकाळी पावसाने पेरणी करण्यास चांगला वापसा आला. शेकऱ्यानी शेतीची मशागत करून, ट्रॅक्टरने नांगरट करण्यासाठी, बियाणे, खते यासाठी मोठा आर्थिक खर्च केला.
मशागत करून पेरण्या मोठया प्रमाणावर उरकल्या. निकृष्ट दर्जाचे बियाणे सोयाबीन पिकांची उगवण न झाल्याने संबंधित कंपन्यांवर प्रशासनाने कारवाई, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट त्यांच्या पुढे ठाकले आहे. तरी कृषीविभागाने पंचनामे करून संबंधित कंपन्यावर कारवाई करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यामधून जोर धरत आहे.
शेकऱ्यानी मशागत, खाते, बियाणे यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. ठराविक कंपन्यांची बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून संबंधित विभागाने पंचनामे करून भरपाई द्यावी व बोगस बियाणे देणाऱ्या संबंधित कंपन्यावर कारवाई करावी
चंद्रकांत शिर्के, अध्यक्ष शेतकरी संघटना वाई तालुका
दुष्काळात तेरावा महिना
करोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करून कशीबशी पेरणी केली. त्यात रिमझिम झालेल्या पावसाने सोयाबीनची शेतात काही प्रमाणात उगवण झाली. काही शेतकऱ्यांनी दुकानातून खरेदी केलेले बियाणे, तर काहींनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले होते. दुबार पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याच्याकडे आता पुन्हा पेरणीसाठी पैसेच नाहीत.