पुणे – “आमदारांना विकासनिधी देण्यासाठी दादा भाजपमध्ये गेले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा निधी रोखून धरल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हतबल झाले आहेत. दादांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, ‘ अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
विकासासाठी आणि आमदारांना 50 कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यासाठी सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते. परंतु, आतापर्यंत आमदारांना 10 कोटी रुपयांचा निधी देखील मिळालेला नाही.
दरम्यान, भाजपमध्ये चेहरे पाहून राजकारण केले जात आहे. नको असलेल्या आपल्याच नेत्यांना भाजपने संपवले आहे. त्यामुळे पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यावर कसा अन्याय केला आहे. हे पाहिल्यावर मग बाहेरून आलेल्या नेत्यांना भाजप कसे मोठे होऊ देईल, असा प्रश्न आम्हाला पडत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.