नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने कितीही ३७० जागा पक्षाला मिळतील, अशी रणनीती तयार केली असली, तरिही ते ३०० जागांच्या जवळ पोहोचतील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह त्यांना ३२५ ते ३३० जागांवर समाधान मानावे लागेल, असे मत ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
पीटीआय संपादकांच्या परिषदेत किशोर बोलत होते. मोदींच्या नेतेपदात भाजपची तिसरी टर्म हुकेल, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे, असे सांगून किशोर म्हणाले की, विरोधी आघाडी एक वर्षाच्या आधीपासूनच बळकट ठेवता आली असती, तर निदान यावेळी काही लढती संघर्षपूर्ण झाल्या असत्या.
काॅंग्रेसला दिला मोलाचा सल्ला
प्रशांत किशोर म्हणाले की, जर या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल मिळाला नाही, तर माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली पावले मागे घेण्याचा विचार करावा. ते सर्व व्यावहारिक हेतूंसाठी, आपला पक्ष चालवत आहेत. गेल्या १० वर्षांत अपेक्षित निकाल पक्षाला ते देऊ शकलेले नाहीत. पण ते आपला मार्गही सोडत नाहीत किंवा इतरांनी पुढे यावे म्हणूनही काही करत नाहीत. माझ्या मते हे लोकशाहीविरोधी आहे.
किशोर म्हणाले की, मी विरोधी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी एक योजना तयार केली होती. परंतु त्या रणनीतीच्या अंमलबजावणीवरून अन्य पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेद यामुळे त्यावर विचारच झाला नाही. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आणि १९९१ मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी राजकारणापासून फारकत घेतल्याकडे लक्ष वेधले.
निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या संस्थांना आपल्या प्रभावाखाली घेत असल्याने निवडणुकीत अपयशी ठरत असल्याच्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या दाव्यावर प्रशांत किशोर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, हे अंशतः खरे असले तरी संपूर्ण सत्य नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागांची संख्या २०६ वरून थेट ४४ इतकी खाली आली होती आणि त्यावेळी ते सत्तेत होते आणि भाजपचा विविध संस्थांवर काहीच प्रभाव नव्हता.
काँग्रेसचे कधीच संपू शकत नाही
काँग्रेस पक्ष उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याच्या दाव्यांबद्दल विचारले असता किशोर यांनी अशा दाव्यांचे खंडन केले. ते म्हणाले की असे म्हणणाऱ्या लोकांना देशाचे राजकारण समजत नाही आणि अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. काँग्रेसकडे केवळ पक्ष म्हणून बघू नये. त्याचे अस्तित्व देशात कधीच संपुष्टात येऊ शकत नाही, ते शक्य नाही. काँग्रेसने आपल्या इतिहासात अनेकवेळा स्वतःला मोठे केले आहे. सोनिया गांधी यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तेव्हा हे घडले होते.