नवी दिल्ली :- भारतीय जनता पक्षाचा कारभार मोदी जी आणि अमित शहा जी या दोनच जींच्या आधारे चालत असल्याने त्यांचाच पक्ष 2 जी पक्ष बनला आहे अशी टीका करीत कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी अमित शहा यांनी तेलंगणातील एका सभेत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस पक्ष म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनी चालवलेला पक्ष असल्याने तो 4 जी पक्ष बनला असल्याची टीका अमित शहांनी केली होती.
पवन खेरा म्हणाले की भाजप मध्ये जे.पी. नड्डा अध्यक्ष आहेत, पण त्यांना पक्षाचा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. हा अधिकार फक्त भाजपच्या 2 जी नेत्यांनाच आहे.
अमित शहा यांनी तेलंगणातील बीआरएस पक्ष हा वडिल मुलांचाच पक्ष असल्याने तोही 2 जी पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बीआरएसच्या नेत्यांनीही अमित शहांवर निशाणा साधला आहे.