मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मुंबईतील तीन नवीन मेट्रोमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ” येणार तर युतीचच सरकार येणार” असे म्हणत भाजप सेना युतीवर शिक्का मोर्तब केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन केले. pic.twitter.com/FMidsTTdjz
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 7, 2019
तसेच यावेळी बोलताना उद्धव म्हणाले की, “मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत,” काळ ३७० चा उल्लेख करत उद्धव म्हणाले की “काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं,” असे सांगत “मोदीजी मला तुमचा अभिमान असल्याचं” त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आत्तापर्यंत भाजप सेनेच्यात युतीबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते. परंतु आता उद्धव ठाकरेंनीच मोदींसमोर युतीबद्दल जाहीर विधान केल्याने युतीवर शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.