कोटा :- आम्ही भिलवाडा इथं जे पाहिलं ते खूप वाईट आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे गृहमंत्रिपद सांभाळू शकेल अशी पात्र व्यक्ती नाही का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट आहे. राजस्थानमध्ये महिलांची अवस्था अत्यंत वाईट असून भिलवाडा येथे घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत खासदार सरोज पांडे यांनी गेहलोत सरकारवर टीका केली आहे.
भिलवाडा येथे अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या अक्षम्य गुन्ह्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्थापन केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीच्या पांडे प्रमुख निमंत्रक आहेत. या समितीमध्ये रेखा वर्मा, कांता कर्दम आणि लॉकेट चॅटर्जी या अन्य खासदारांचा समावेश आहे. या समितीने भिलवाडा येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पांडे बोलत होत्या.
सरोज पांडे म्हणाल्या की, आजपर्यंत एकही जबाबदार लोकप्रतिनिधी पीडितांना भरपाई देण्यासाठी पोहोचलेला नाही. असंवेदनशीलतेचा परमोच्च बिंदू गाठून कॉंग्रेसला पुन्हा निवडणुकीत उतरायचं आहे. गेहलोत सरकारची ही अत्यंत घृणास्पद स्थिती आहे. मी मुलगी आहे, मी लढू शकते, असं म्हणणाऱ्या प्रियंका वढेराही या गरीब मुलीसाठी पुढे येणार आहेत की नाही?
प्रियंका गांधी यांना मी एकदा तरी या भागात यावे आणि या गरीब मुलीच्या घरी जावे. त्याचबरोबर हे असंवेदनशील सरकार हटवायला हवं. कारण, हे सरकार ना जनतेसाठी काम करतं, ना महिलांसाठी.
काय घडली घटना….?
भिलवाडा येथे सामूहिक बलात्कारानंतर एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला भट्टीत जिवंत जाळण्यात आले. हे प्रकरण याच राज्यातील बहुचर्चित भंवरी हत्या प्रकरणासारखे आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर बेशुद्ध अवस्थेत तिला भट्टीत टाकण्यात आले. त्यानंतर त्याचा पुरावा नाहीसा करण्यासाठी अर्ध्या जळालेल्या मृतदेहाचे तुकडे करून एका तलावात फेकण्यात आले होते.