मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोमवारी वर्धापनदिन होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधला होता. यातच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 20 वा वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा पुढचा टप्पा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली की,’गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांना भाजपने तिकीट दिलं. देशासाठी आणि भाजपसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. लोकसभा निवडणुुकीत नरेंद्र मोदींनी देशासमोर प्रखर राष्ट्रवाद मांडला. म्हणून त्यांच्या भूलथापांना जनता बळी पडली परंतू विधानसभा निवडणुकीला भाजपकडे चेहरा नाहि येत्या विधानसभेला तुम्हाला दिसेल, भाकरी फिरवलेली असेल असेही ते म्हणाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, मुंबई अध्यक्ष मा. सचिन अहिर, आ. हेमंत टकले, आ. प्रकाश गजभिए, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मा. आ. अशोक धात्रक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तसेच इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.