नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीची गळचेपी होत आहे. भारतीय राज्यघटनेचीही राज्यात अंमलबजावणी झालेली नाही. कारगिलमध्ये धर्मनिरपेक्ष पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांना बहुमत मिळाले आहे. या विजयामुळे भाजपमध्ये (bjp) अस्वस्थता वाढली आहे. भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे आता दिसून येत आहे, अशा शब्दांत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दहशतवाद्याने गोळ्या झाडलेल्या साहिल बशीर दार या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याचे सांत्वन करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती येथे येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, काश्मीरमध्ये अजूनही निष्पाप लोकांचे रक्त वाहत आहे ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
मेहबूबा मुफ्ती यांनी पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील संघर्षावर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, हमासने जे केले त्याचा त्या निषेध करते. पण, हमासने इस्रायलवर हल्ला केल्यावरच पाश्चात्य जगाला जाग आली. असा निवडक आक्रोश होता कामा नये. इस्रायल अनेक दशकांपासून पॅलेस्टाईनमध्ये अत्याचार करत आहे, याविषयी कोणीच बोलत नाही.