कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपा व आरएसएसची विचारसरणी आरक्षणाच्या विरोधातील आहे. त्यांना एससी, एसटी समजातील लोकांचा विकास नकोय, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Rahul Gandhi: BJP & RSS’s ideology is against reservations. They never want SC/STs to progress. They’re breaking the institutional structure. I want to tell SC/ST/OBC&Dalits that we’ll never let reservations come to an end no matter how much Modi Ji or Mohan Bhagwat dream of it. pic.twitter.com/eyCLigBa8q
— ANI (@ANI) February 10, 2020
देशात एकीकडे सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेवर टीका केली आहे. भाजप आणि आरएसएस विचारसरणी आरक्षण विरोधी आहे. त्यांना एससी आणि एसटी समाजातील लोकांचा विकास नकोय, ते संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मी एससी, एसटी, ओबीसी व दलितांना सांगू इच्छितो की, आम्ही आरक्षण कधीच संपुष्टात येऊ देणार नाही, हा घटनेचा मुख्य भाग आहे. यासाठी मोदीजी किंवा भागवत यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी काही फरक पडणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
आज राज्यघटनेवर आक्रमण होत आहे. भाजपा व आरएसएस कोणत्या ना कोणत्या प्रकारे आरक्षण घटनेतुन काढू इच्छित असल्याचाही राहुल गांधी यांनी आरोप केला आहे. ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे ऍट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून, आरोपीच्या अटकपूर्व जामीनाचा मार्गही बंद झाला आहे.