जलपैगुडी – बिकानेर एक्सप्रेसच्या अनेक बोगी प. बंगालमधील जलपैगुडी जिल्ह्यात घसरल्या. त्यात 5 जण मरण पावल्याचे वृत्त असून रेल्वे पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले आहे. सुमारे 40 जण जखमी झाले. या रेल्वेत सुमारे 1200 प्रवासी असावेत असा अंदाज आहे. सुमारे 12 बोगी घसरल्याची प्राथमिक माहिती रात्री नऊवाजता हाती आली.
राजस्थानमधील बिकानेरहून आसाममधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या या रेल्वेच्या बोगी जैलपगुडी जिल्ह्यातील मैनागुडी स्थानकाच्या पुढे घसरल्या. हा अपघात गुरूवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घसरल्या. या स्थानकावर या रेल्वेला थांबा नाही.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मैनागुडी आणि जलपैगुडी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच सिलीगुडीहून राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून त्यात 100 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक पोहोचल्यानंतर मदतकार्याला वेग आला आहे.