कात्रज – शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे. तीन सदस्यांचाच प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ताबडतोब निवडणुका लागू शकतात, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, या आठवड्यात पूर्वीची प्रभाग रचना रद्द झाली होती. त्यानंतर प्रभाग रचना बदलणार का? कीतीचा प्रभाग राहिल असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र पवार यांनी प्रभाग तीनचाच राहणार असल्याचे सूचक विधान केले आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना जागृत राहण्याचेही आवाहन केले आहे.
माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधी नगर – बिबवेवाडी परिसरातील मनपाचे उभारलेल्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले. उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधाांच्या गुणवत्तापूर्ण भर पडेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
कोरोनाचे संकट जगासह राष्ट्र, राज्य, परिसरावर आले आणि आपण खळबळून जागे झालो. आरोग्याला जेवढे महत्त्व देऊ, तेवढे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. तसेच यावेळी राज्यासाठी काल मांडलेले पंचसूत्री अर्थसंकल्प यातील सर्वसामान्य जनतेसाठी च्या बाबी मांडल्या. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखी महापालकेच्यावतीने रुग्णालय उपलब्ध झाले. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा मिळतील. मात्र हॉस्पिटल कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी कोणाला याचा वापर ना करण्याची संधी मिळो. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. तसेच डॉक्टरांनी त्याचा अनुभव पणाला लावून रुग्णांचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतर ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. व कात्रज पर्यंत मेट्रो लवकरात लवकर काम सुरू होऊन मेट्रो सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी केले. ते म्हणाले, या भागात मध्यमवर्गीय लोकसंख्या अधिक आहे आणि त्यांच्या आरोग्य सेवेकरिता चांगली सुविधा होणार आहे. दादांच्या हस्ते लोकार्पण होताना आनंद होतो आहे. यावेळी धनकवडे तसेच दुगड परिवारातर्फे अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार चेतन तुपे, रा.कॉ.शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक प्रकाश धारीवाल, ओमप्रकाश रांका, प्रमोद दुगड, विजय आप्पा रेनुसे, नगरसेवक विशाल तांबे, नगरसेविका अश्विनी भागवत, व मोठा जनसमुदाय उपस्थित होते.