निमसाखर – येथील हगारेवाडी परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे कारले, बाजरी तसेच आंबा पिकांना मोठा फटका बसला आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. त्यात भर म्हणून शनिवार जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडासह जोरदार एक तास पाऊस झाला.
या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे निमसाखर येथील लक्ष्मण गोरे यांची दोन एकर कारल्याचे पीक भुईसपाट झाले. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबरच सुहास रणवरे यांच्या दोन एकरमध्ये सुमारे पावणे दोन हजार केशर व हापूस या जातीची झाडे आहेत. पावसामुळे या झाडांचे एक टन पेक्षा जास्त आंबे पडून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबर बाजरी, मका ह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महसुली खात्याने लवकरात लवकर बाधीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे व फळबागांचे पंचनामे करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.