कर्जत,(वार्ताहर) – कळंब जिल्हा परिषद वार्डात ९ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा आणि लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत खांडस, अंभेरपाडा आणि नांदगाव हद्दीतील ही कामे होणार आहेत.
या वेळी १२ विकासकामांमध्ये काठेवाडी, पादीरवाडी सरस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी, खांडस, अंभेरपाडा रस्त्यासाठी १ कोटी रुपये आणि चिंचवाडी ते मोहपाडा रस्त्यासाठी १ कोटी निधी, नांदगाव, भोमाळवाडी, मोहपाडा कोतवाल समाधी रस्त्यासाठी ७० लक्ष रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.
चाफेवाडी येथील पुलाचे ज्याकेटिंग आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी, चाफेवाडी दत्तमंदिर सभामंडप दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी १० लक्ष रुपयाची तरतुद, जांभूळवाडी जोडरस्ता तयार करण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी, कशेळे-खांडस गणपती घाट रस्त्यावर लहान साकवांचे दुरुस्ती करण्यासाठी १.५ कोटी रुपये इतकी तरतुद करण्यात आली आहे.
पेटारवाडी मुदगनवाडा साकवाच्या बांधकामासाठी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. धाबेवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे आणि बांगारवाडी येथे सभा मंडप दुरुस्ती करणे यासाठी प्रत्येकी ५ लक्ष रुपयाची तरतुद केली आहे. तसेच तुंगी जोडरस्ता तयार करण्यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुण देण्यात आला आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावाला पक्का रस्ता
तुंगी जोडरस्ता तयार करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. देश स्वतंत्र्य झाल्यानंतर प्रथमच या गावात पक्का रस्ता येणार आहे, असे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. विशेष म्हणजे या दुर्गम गावात असल्याने अनेकजण टाळतात. सुधाकर घारे यांनी गावासाठी रस्त्यासाठी निधी मिळवून दिला असून या डोंगरावर असणाऱ्या गावात जाऊन लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या इतरही अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.