वाडाच्या पश्चिम भागातील स्थिती : 10 गावांवर पाणीटंचाईचे संकट गडद
वाडा- वाड गावच्या पश्चिम भागात भीमा नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला आहे. तर या नदीच्या पाण्यावर जळपास 10 गावांचा पाणीपुरवठा अंवलबुन असून केवळ 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लाक असल्याने लवकरच या गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन टॅंकर धावतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी आताच पाण्याचे नियोजन करून या गावांचा उन्हाळा सुसह्य, करावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती.
वाडा गावच्या पश्चिम भागातील डेहणे, वांजळे, धुवोली, शिरगाव, मोरोशी, खरोशी, एकलहरे, धामणगाव बुद्रुक, शेदुर्ली, या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ नदीचा स्त्रोत उपलब्ध आहे. या परिसरात विहिरी आणि कुपनलिका यांची संख्या नगण्य आहे.
दरम्यान, यंदा दमदार पाऊस झाल्याने हा उन्हाळा सुसह्य होईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र, परिसरात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नाही, कुपनलिकाही नाही, विहिरीही मोजक्याच असल्याने पाणीसाठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने डोंगरदऱ्यातून कोसळणारे पाणी दरवर्षी वाहून जाते,त्याचपद्धतीने यंदाही झाल्याने आता पाणीटंचाईचे चटके लवकर बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस होऊन देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांच्या डोक्यावर हंडा दिसणार असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
- पाण्याअभावी प्राण्यांचेही स्थंलातर
या परिसरात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो केवळ पाण्याअभावी जनावरांना हिरवा चारा मिळत येत नाही. तर मोर, साबर, रान डुक्कर, भेकर, तरस या प्राण्याचे अस्थित्व असते. पाणीटंचाईमुळे हे प्राणी स्थंलातर करतात, त्यामुळे जंगलतोड होण्याची भीती व्यक्त होत आहे.