मुंबई – जयपूर पिंकपॅंथर्सने बंगाल वॉरियर्सवर 27-25 असा विजय मिळविला. कबड्डीत कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे बदलले जाऊ शकते. जयपूर संघाविरुद्ध बंगालने मध्यंतराला 14-10 अशी आघाडी घेतली होती. या आघाडीच्या जोरावर सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांपर्यंत त्यांच्याकडेच विजयाचे पारडे झुकले होते.
A commanding lead, an inspired comeback and a last-raid finish – #JAIvKOL had it all! ?
Join us tomorrow for more action from #VIVOProKabaddi Season 7 on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/mpHL7Ywd3E
— ProKabaddi (@ProKabaddi) July 27, 2019
जयपूरच्या संदीप धूल व दीपक हुडा यांनी त्यानंतर जोरदार चढाया करीत बंगालची आघाडी कमी केली. एक मिनिट बाकी असताना बंगालकडे 24-23 अशी आघाडी होती. त्यांच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र दीपक हुडाने बंगालच्या रिंकू नरवाला बाद करीत लोण चढविला. हाच लोण बंगालला महागात पडला.
जयपूरने तेथे 26-24 अशी आघाडी घेतली. शेवटपर्यंत आघाडी आपल्याकडे घेत जयपूरने विजयश्री खेचून आणली. यावेळी बंगालच्या खेळाडू हताशपणे आपण कसे हरलो याच विवंचनेत पडले.