जळोची- बारामतीत दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश रहदारीच्या रस्त्यांवर गुडघ्या एवढे पाणी साचले आहे. विशेषतः बारामती शहरातील आमराई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील जळोची येथे स्थलांतरित केलेल्या नागरिकांची घरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. सहाशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिकांच्या घरातील घरगुती वस्तू व महत्वाची कागदपत्रे पाण्याखाली गेली आहेत. तसेच नागरिकांसह जनावरांचे ही मोठे हाल झाले आहेत.सध्या येथील सुमारे पाचशे ते सहाशे रहिवाशांची बारामती शहरातील सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी निवासाची सोय करण्यात आली आहे.