बारामती – म्हणतात ना वीज पडेल तिथं पाणीच काढते. याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी आलाय..
कोरेश्वर मंदीर परिसरात पावसात काल साडे पाचच्या सुमारास कोरड्या तलावात वीज पडली. आज मेंढ्या चारायला गेलेल्या मेंढपाळाना यावेळी या तलावाच्या पाण्यातुन बुडबुडे येत असल्याचे दिसून आले.
24 तास होऊन देखील या पाण्यातून बुडबुडे येत पाण्याचा प्रवाह सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला असुन स्थानिक लोक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.