पुणे- बँकांच्या खाजगीकरण विरोधात देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी सरकारच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाचा काल म्हणजेच, सोमवारी (दि. १५) मोठा परिणाम दिसून आला.
संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती.
बँकांची सेवा आणि कामकाज बंद असल्यामुळे सोमवारी तब्ब्ल १६५०० कोटीचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आज मंगळवारी (दि. १६) सुद्धा बँक सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या तरी नागरिकांना एटीएम आणि डिजिटल बँकिंग सेवेवर अवलंबून रहावे लागेल. सोमवारी मुंबईत जवळपास ६५०० कोटीचे चेक, डीडी आणि पे ऑर्डर्सचे व्यवहार ठप्प झाले. तर राजधानी दिल्लीत ४८५० कोटीचे चेक व्यवहार रखडले.