नवी दिल्ली – देशभरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढत असून अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा रद्द केल्याचे वृत्त ही केवळ अफवा असून दिशाभूल करणारे आहे. तसेच व्हायरल होणारा व्हिडीओ हा मागच्या वर्षीचा आहे. चुकीचा संदर्भ देऊन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे.
याशिवाय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वे रद्द केल्याचे वृत्त जुने आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द केल्याचे वृत्त खोटे असून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक खबर में दावा किया जा रहा है कि 31 मार्च तक सभी ट्रेनें रद्द कर दी गई हैं। #PIBFactCheck: यह खबर पुरानी है। @RailMinIndia ने 31 मार्च, 2021 तक ट्रेन रद्द करने का यह फैसला नहीं लिया है। इस पुरानी खबर को गलत संदर्भ में साझा किया जा रहा है। pic.twitter.com/YcZ8Za9Vj1
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 15, 2021