मुंबई – तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला 29 वर्षीय बांगलादेशी नागरिक त्यांच्या ताब्यातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. अन्वर उर्फ शहादत हाशिम असे आरोपीचे नाव असून तो रविवारी संध्याकाळी फरार झाला. त्याला 2020 मध्ये महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने बनावट कागदपत्रांसह बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याबद्दल पकडले होते.
या प्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते, त्यानंतर त्याला एटीएसच्या काळाचौकी युनिटच्या ताब्यात ठेवण्यात आले होते, अधिकाऱ्याने सांगितले की, तेथून त्याला बांगलादेशला पाठवले जाणार होते.
रविवारी संध्याकाळी अन्वर काळाचौकी युनिटमधील वॉशरूममध्ये गेला आणि तेथून तो एटीएसच्या ताब्यातून पळून गेला. या प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.