खिळेमुक्त झाडे, “मामाच्या गावाला जाऊ या’, चला उद्योगी बनूया असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविणारे माधव धनवे पाटील या उच्चशिक्षित तरुणाने पर्यावरण, समाजकारण आणि राजकारण यांच्यात समतोल साधण्याचा अनुकरणीय प्रयत्न केला आहे.
एक हुशार अभियंता अशी उद्योग क्षेत्रात ओळख असल्याने भरपूर उत्पन्न मिळवित ऐशो आरामाचे जीवन जगणे माधव पाटील यांच्यासाठी सहज शक्य होते. परंतु मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाण्यासाठी होणारी वणवण पाहून त्यांनी आपला बहुतेक वेळ परिस्थिती बदलण्यासाठी देण्याचे ठरविले. पाणी बचाव मोहीम राज्यभर राबविण्यासाठी त्यांनी आंघोळीची गोळी ही संस्था स्थापन केली. पाण्याचे महत्त्व, अपव्यय या समस्यांचा केवळ अभ्यासच केला नाही तर त्यावरील उपाययोजनाही शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ तोंडी बोलून काहीही होत नाही, हे माहीत असल्याने या सर्व बाबींचे त्यांनी व्यवस्थित डाक्युमेंटेशन केले.
आणि प्रशासन खडबडून जागे झालेस्वदेशी झाडे कशी वाढविता आणि वाचविता येतील, यासाठी काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा जाहिरातबाजीसाठी लोकांनी झाडांना मारलेले खिळे, तारा, दोऱ्या पाहून व्यथित होऊन त्यांनी खिळेमुक्त झाड अभियान. सुरू केले. पाहता-पाहता हे अभियान राज्यभर पोहचले. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे “पेन फ्री ट्री, नेल फ्री ट्री ‘ही चळवळ देशभरात सुरू झाली. हजारो झाडांमध्ये रुतलेले लाखो खिळे बाहेर पडू लागले. यानंतर प्रशासन देखील जागे झाले आणि महापालिकांनी झाडांना खिळे मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
सामाजिक कार्ये आणि पाठपुरावा
माधव पाटील यांनी बीई पूर्ण केले आणि इंजिनियर झाले. मग एलएलबी, एमबीए फायनान्स केले. तत्वज्ञान या विषयात एमएची पदवी मिळवली आणि आता ग्रामीण विकास या विषयावर पीएचडी करत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तृतीयपंथीयांसाठी भारतातील पहिले सार्वजनिक स्वच्छतागृह पिंपरी चिंचवड शहारत उभे रहावे म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. नवीन वर्षात “हरित परिसर’ हा संकल्प घेऊन विविध उपक्रमांमध्ये रोपांचे वाटप करत आहेत. सलग 75 तास लसीकरण मोहीम सुरु होती, तेव्हा माधव पाटील यांच्या पुढाकाराने एका नागरिकाला पहाटे 3.30 वाजता लस देण्यात आली.
करोनाकाळात अनेकांना हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन आणि इंजेकशन्स मिळावे म्हणून ते प्रयत्नशील राहिले. दिव्यांगांना सार्वजनिक स्वच्छतागृह सहज वापरता यावे म्हणून “ओके’ या संकल्पनेद्वारे ते पालिकेसोबत चर्चा करत आहेत. त्यांच्या दळवीनगर परिसरात बस थांबा व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत.
राजकारणात आल्यानंतर पदवीधरांनी व्यवसायात उतरावे म्हणून वेळोवेळी युवकांना ते मार्गदर्शन करत असतात. नुकतेच त्यांनी रस्त्यावर पोट भरणाऱ्या पथारीवाल्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्र्यांचे वाटप केले. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग घरात आपल्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या प्रभागातील प्रत्येक आईचा करोना योद्धा म्हणून त्यांनी सन्मान केला. ते आणि त्यांची टीम रक्तदान शिबिरांचे नियमितपणे आयोजन करतात.
माधव यांनी एकदा दुष्काळ अनुभवण्यासाठी मराठवाड्याचा दौरा केला. बीडच्या एका अनाथ आश्रमात काही मुले झाडाच्या बुंध्याशी आंघोळ करत होती. मग समजले की तेच पाणी झाडाला उपयोगी पडते. पण त्या मुलांना पाणी टंचाई इतकी जाणवत होती की रोज अंघोळ करता येत नव्हती. म्हणजे रोज झाडांनाही पाणी नाही.
तेव्हा असे वाटले की या मुलांना शहरात 24 तास पाणी असणाऱ्या गावाला न्यायचे, मामाच्या गावाला न्यायाचे, आपण त्यांचे मामा बनायचे, त्यांना स्वप्ने दाखवायची आणि फुल्ल धमाल करायची. आणि मग त्यातूनच मामाच्या गावाला जाऊ या हा उपक्रम सुरू केला. दरवर्षी वेगवेगळ्या अनाथ, अपंग मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत ते पुणे अणि पिंपरी-चिंचवडमध्ये घेऊन येतात. त्यांना पुणे आणि आसपासच्या परिसरात फिरवून आणतात, त्यांना मामाच्या गावाला आल्यासारखं वाटत. दरवर्षी अशा अनेक मुलांचे हक्काचे मामा बनतात माधव पाटील…
थंडीचा जोर वाढल्यानंतर त्यांनी बांधकाम मजुरांच्या मुलांना उबदार लोकरी कानटोप्यांचे वाटप केले.