लखनौ – राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलून “अमृत उद्यान’ करण्यात आल्याने देशातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन ज्वलंत समस्या सुटतील का, असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. मोदी सरकारने आता प्रसिद्धीपेक्षा राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही मायावतींनी केंद्र सरकारला दिला आहे.
बसपा प्रमुखांनी रविवारी सकाळी ट्विट केले की, मूठभर लोक सोडले तर देशातील संपूर्ण लोकसंख्या महागाई, गरिबी आणि बेरोजगारी यांसारख्या समस्यांनी त्रस्त आहे. त्यांच्या निराकरणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी धर्मांतर, नाव बदलून लोकांचे लक्ष भरकवटले जात आहे.
1. कुछ मुट्ठीभर लोगों को छोड़कर देश की समस्त जनता जबरदस्त महंगाई, गरीबी व बेरोजगारी आदि के तनावपूर्ण जीवन से त्रस्त है, जिनके निदान पर ध्यान केन्द्रित करने के बजाय धर्मान्तरण, नामान्तरण, बायकाट व नफरती भाषणों आदि के जरिए लोगों का ध्यान बांटने का प्रयास घोर अनुचित व अति-दुःखद।
— Mayawati (@Mayawati) January 29, 2023
राष्ट्रपती भवनाच्या प्रसिद्ध मुघल गार्डनचे नाव बदलल्याने देशातील करोडो लोकांच्या दैनंदिन ज्वलंत समस्यांचे कसे निराकरण होईल, हे सरकारने स्पष्ट करावे. अन्यथा सर्वसामान्य जनता हा सरकारचा आपल्या उणिवा आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न मानेल, असेही मायावती म्हणाल्या.
Water supply : …तर दिल्लीकरांना 24 तास पाणीपुरवठा करू – मुख्यमंत्री केजरीवाल
“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान, भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवन उद्यानाला ‘अमृत उद्यान’ असे नाव दिल्याने आनंद होत आहे,” असे राष्ट्रपतींच्या माध्यम सचिव नाविका गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटले आहे.