मुंबई: देशातील सर्व बॅंकांकडील थकित कर्जांचे प्रमाण धोकादायक स्थितीत वाढत आहे मार्च 2020 मध्ये थकित कर्ज म्हणजेच एनपीएचे प्रमाण 8.5 टक्के इतके होते ते आता 12.5 टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून अत्यंत गंभीर आर्थिक स्थितीत मार्च 2021 मध्ये हे थकित कर्जाचे प्रमाण थेट 14.7 टक्क्यांवर सुद्धा जाऊ शकते अशी शक्यता रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक स्थैर्याच्या संबंधातील एका अहवालात वर्तवण्यात आली आहे.
देशातील बॅकिंग क्षेत्रातील ही स्थिती चिंताजनक असून पुढील वर्षभरात ही परिस्थिती आणखी कशी वळणे घेते हे पहावे लागेल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बॅंकांचे सारे आर्थिक आरोग्यच या एनीपीएमुळे िंचंतानक होऊ शकते असा इशाराही यात देण्यात आला आहे. पुढील वर्षभराच्या काळात ग्रॉस एनपीएची पातळी मध्यम, गंभीर किंवा अतिगंभर अशा कोणत्याही पातळीवर जाऊ शकते. एनपीएच्या वाढत्या प्रमाणामुळे बॅंकांच्या ताळेबंदांवरही विपरीत परिणाम होत असतात.