Controversial Statement : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (mla bacchu kadu) हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत येत आहेत. विदर्भातील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या वादात रूढी घेतल्यानंतर आता बच्चू कडू (mla bacchu kadu) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी आजकाल तृतीयपंथीदेखील आमदार होत आहेत असे वक्तव्य केले. दरम्यान, आपली चूक लक्षात येताच नाही माफी देखील मागितली. मात्र, त्यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगावातल्या एका सभेत बोलत असताना बच्चू कडू यांची जीभ घसरली. यावेळी त्यांनी, “मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा आपला पक्ष आहे असं आमदार बच्चू कडू बोलले. त्यानंतर आज काल तृतीयपंथीयही आमदार होतात असे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी आता माफी मागितली असल्याचे म्हटले जात आहे.
आमदार बच्चू कडू (mla bacchu kadu) यांनी रविवारी जळगाव जिल्ह्यात झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संवाद मेळाव्यात भाषण केलं. त्यावेळी ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदार होतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण काय बोलून गेलो ही चूक त्यांच्या लक्षात आली.
मेळाव्यातल्या भाषणात आपण जे बोललो ते चुकीचं होतं हे लक्षात आल्यानंतर बच्चू कडू यांनी या वक्तव्याबाबत माफी मागत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोक आमदार होतात असं मला म्हणायचं होतं मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो असे बच्चू कडूंनी (mla bacchu kadu) म्हटले आहे.