मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या अयोध्या प्रकरणावरील युक्तीवाद पुर्ण झाला आहे. दरम्यान, आता या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच या प्रकरणा संदर्भातील विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद केले आहे.
शरद पवार म्हणाले,’ सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या निकाल अपेक्षित आहे. निकाल लागल्यानंतर समाजातील कोणत्याही घटकाने हा निकाल आपल्याविरोधात लागला आहे, असा विचार करू नये. न्यायालयीन निर्णय लागल्यावर तो सामंजस्याने स्वीकारावा, निकाल काहीही लागला तरी कोणीही कायदा हातात घेऊ नये, जी परिस्थिती १९९२ साली उद्भवली त्याची पुनरावृत्ती होऊ नये’असे आवाहन पवार यांनी केले आहे.