मंचर, (प्रतिनिधी) – एकलहरे (ता.आबेगाव) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जीवामृत कसे बनवावे, या विषयावर प्रात्यक्षिक शेतकऱ्यासमोर सादर केले. शेतकऱ्यांमध्ये जीवामृताचे महत्त्व या संबंधित जनजागृती व्हावी.यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी येथील विद्यार्थिनींनी जीवामृत हे जैविक खतांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे व त्याच्या वापरामुळे पिकांची वाढ जोमदार होते. उत्पन्नातही वाढ होते, अशी माहिती दिली.
त्याचबरोबर मातीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते. जीवामृत हा रासायनिक खतांसाठी एक उत्तम पर्याय आहे, असे विद्यार्थिनी श्वेता भांडवलकर, निकीता गवळे, स्नेहल मोटे, वैष्णवी पाटील व कीर्थना ताल्लुरी यांनी सांगितली.