लखनौ – उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याच्या मुद्द्यावरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सरकारने अनेक घोषणा केल्या पण त्यानंतरही राज्यांतील दलित आणि महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. महिलांच्या हत्या आणि बलात्कारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे सरकारच्या जबाबदारी आणि हेतूविषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.
उत्तरप्रदेशात विद्यार्थिंनींना घराच्या बाहेरच पडणे अवघड बनणार असेल तर अशी कायदा आणि सुव्यवस्था काय कामाची असा सवालही मायावती यांनी ट्विटरवर विचारला आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर कॉंग्रेसकडूनही सातत्याने टीका होत आहे.
तथापि, मायावती यांनीही आता हा विषय जोरदारपणे लावून धरत योगी सरकारच्या विरोधात कडक भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे.