मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठले आहे. सध्या आसाम येथे पूर परिस्थिती आहे. तुमच्या असण्यामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर गुवाहाटी सोडा असं पत्र आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लिहले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटी इथे असल्यामुळे हे ठिकाण बदनाम होत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.
Assam Congress chief Bhupen Kumar Borah writes to rebel Maharashtra Shiv Sena MLA Eknath Shinde and asks him to leave Assam at the earliest "in the interest of the state" pic.twitter.com/OajA322m6M
— ANI (@ANI) June 24, 2022
आसामची प्रतिमा खराब होतेय …
सध्या महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचे प्रकरण देशभर गाजत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पात्रात लिहिले आहे की, एकीकडे राज्यात पूरपरिस्थिती आहे मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे आदरातिथ्य होत आहे. हे योग्य नाही बंडखोर आमदारांचे आदरातिथ्य होणे योग्य नाही. कारण तुम्हाला संविधानिक मूल्याशी काहीही देणंघेणं दिसत नाही. आसामनं भारतरत्न गोपीनाथ बोरडोलोई आणि तरुण गोगाई यासारखे मुख्यमंत्री दिलेले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. हेमंत शर्मा हे तुमच्या घोडेबाजाराला सहकार्य करत असल्याचा आरोप होतोय. आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री तुम्हाला सहकार्य करीत आहेत. यामुळे आसामच्या लोकांची प्रतिमा खराब होत आहे. आसामच्या भल्यासाठी लवकरात लवकर आसाम सोडा अशा आशयाचे पत्र एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.