दिसपूर – आसाम सरकार राज्यात बहुपत्नीत्वाची प्रथा बंद करण्यासाठी कायदा करणार आहे. त्यासाठी सरकार विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार आहे. या अधिवेशनातच विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी गुवाहाटी येथे सांगितले. काही कारणास्तव या अधिवेशनात विधेयक आणता आले नाही, तर ते विधानसभेच्या जानेवारीच्या अधिवेशनात आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आसाममधील बहुपत्नीत्वाची प्रथा तात्काळ थांबवायची आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
मुस्लिम पुरुषांनाही एकच लग्न करण्याचे आवाहन –
मे महिन्यात, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील शनिवारसंथे मडिकेरी येथे एका मेळाव्यात सांगितले होते की, ते राज्यात समान नागरी संहितेवर काम करतील आणि बहुपत्नीत्व आणि बालविवाह थांबवतील. मुख्यमंत्री म्हणाले की, मुस्लिम वगळता इतर धर्माच्या लोकांमध्ये बहुपत्नीत्वावर यापूर्वीच बंदी आहे. त्यांनी मुस्लिमांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मुलींना बाळंतपणाचे यंत्र बनवण्याऐवजी डॉक्टर आणि इंजिनियर बनवावे. त्यांनी मुस्लिम पुरुषांना एकच लग्न करण्याचे आवाहन केले.
सरकार सर्वांसाठी कायदा करणार –
आयपीसीच्या कलम 494 नुसार मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांना पहिल्या पत्नीची संमती देखील घ्यावी लागेल. हा अधिकार फक्त पुरुषांना आहे, मुस्लिम महिलांना एकापेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करण्याची परवानगी नाही. आसाम सरकार असा कायदा करणार आहे, ज्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांना पत्नी किंवा पती जिवंत असताना पुनर्विवाह करण्याची परवानगी नाही, मग तो धर्म किंवा जात कोणताही असो.
आयपीसी कलम 494 अन्वये दुसरा विवाह हा गुन्हा –
खरे तर IPC च्या कलम 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असल्यास पुनर्विवाह करणे हा गुन्हा आहे. पती किंवा पत्नी हयात असताना दुसरा विवाह केल्यास ते वैध ठरणार नाही. याचे पालन न करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागू शकते. यासाठी जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा, तसेच दंड. जर काही कारणास्तव न्यायालयाने दुसरा विवाह बेकायदेशीर घोषित केला असेल तर कोणतीही शिक्षा होणार नाही. जर पती-पत्नी सात वर्षांपासून वेगळे राहत असतील, किंवा दोघांपैकी एकाचे नाते संपुष्टात आले असेल, किंवा दोघांपैकी कोणाचाही ठाव ठिकाणा नसेल, तर त्यांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वीही बालविवाहाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यास सांगितले होते. यासाठी तज्ज्ञांचे मत घेण्याचेही त्यांनी सांगितले होते.