Asia Cup 2023 IND v PAK :- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर फक्त आयसीसी (ICC) च्या स्पर्धेमध्येच भिडतात. त्यामुळेच दोन्ही देशातील क्रीडा रसिकांसोबत जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत.
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक दोन नव्हे तर तीनवेळा सामना होऊ शकतो.. पाहूयात कसं…
दोन्ही संघांमधला पहिला सामना 2 सप्टेंबरला ग्रुप स्टेजमध्ये होणार आहे. याशिवाय, जर दोन्ही संघ सुपर फोरसाठी पात्र ठरले तर 10 सप्टेंबर रोजी या फेरीत पुन्हा दोन्ही संघांचा सामना होईल.
दुसरीकडे, जर भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये अव्वल दोन स्थानांवर राहिले तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. आणि हा या दोघांचा या स्पर्धेतील तिसरा सामना ठरू शकतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यांच या स्पर्धेत दोन सामने तर नक्कीच होतील. पण जर या दोन्ही संघांनी फायनल गाठली तर त्यांच्यामध्ये तिसरा सामनाही खेळवला जाऊ शकतो.
आशिया चषक स्पर्धेत सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर फोरमध्ये पोहोचतील. त्यानंतर यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत खेळतील. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ, तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.