नवी दिल्ली – मेड इन इंडियाबाबत भारत किती गंभीर आहे, याचा ताजा पुरावा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. मोबाईल उद्योगातील मोदी सरकारच्या यशाची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील मोबाईल उत्पादन केवळ 9 वर्षात 20 पटीने वाढले आहे. मोबाईल उद्योगातील तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी सोशल साइट एक्सवर ही माहिती दिली.
अश्विनी वैष्णव म्हणाले, 2014 मध्ये देशातील 78 टक्के मोबाईल उद्योग आयातीवर अवलंबून होता आणि आज 9 वर्षांनंतर 2023 मध्ये भारतात विकले जाणारे 99.2 टक्के मोबाईल हे ‘मेड इन इंडिया’ आहेत. भारताचे आयातीवरील अवलंबित्व बर्याच प्रमाणात कमी झाले आहे. भारतात विकल्या गेलेल्या 99.2 टक्के फोनवर मेड इन इंडिया स्टॅम्प आहे, ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मोबाईल उत्पादनात येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी अनेक अधिकारी आणि ब्रँड्ससोबत बैठक घेण्यात आली, त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
Met Mobile industry to review progress.
📱Industry has grown 20 times in 9 years.👉2014: 78% import dependent
👉2023: 99.2% of all mobiles sold in India are ‘Made In India’. pic.twitter.com/SxUeDwNjsn— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) November 25, 2023
मोबाइल क्षेत्राच्या या वाढीमुळे देशांतर्गत उत्पादन परिसंस्था मजबूत झाली नाही तर भारताचे परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यातही मोठा हातभार लागला आहे.
गुगलने अलीकडेच आपल्या Pixel फोनबद्दल सांगितले आहे की, हा फोन भारतात तयार केला जाईल. भारतात विकले जाणारे पिक्सेल फोन भारतात बनवले जातील. याआधी Apple, Samsung, Xiaomi, Realme, Oppo, Vivo आणि OnePlus सारखे अनेक ब्रँड भारतात त्यांचे फोन बनवत आहेत.