नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा अनुभवी ऑफस्पिन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने फलंदाजी व गोलंदाजीत विक्रमी कामगिरी केली. या मालिकेत अश्विनने उपयुक्त फलंदाजी करताना 189 धावा केल्या व भेदक गोलंदाजी करताना 32 बळीही घेतले.
अश्विनच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकेचा मानकरी हा पुरस्कारही मिळाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 30 पेक्षा जास्त बळी दोन वेळा घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी 2015 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत त्याने 31 बळी घेतले होते.