मुंबई- आगामी विधानसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
दरम्यान, यावेळी अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या फोडाफोडीचं राजकारण करत आहे. असं अशोक चव्हाण यांनी म्हंटल आहे. काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री फोन करून भाजपात येण्याचे आमंत्रण देत आहे. असं देखील यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.