मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी म्हटले आहे की, “कोरोना विषाणूपासून सावरल्यानंतर मनोरंजन जग जोरदार पुनरागमन करेल, मात्र त्याआधी सर्वाना सोशल डिस्टंशिंग आणि स्वच्छतेबाबतच्या सरकारी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे” असं त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“प्रत्येक उद्योगाला कोरोना विषाणूमुळे फटका बसला आहे. मात्र हे संकट जास्त काळ टिकणार नसून, जग पुन्हा धावू लागेल. आम्हाला सर्वांना मनोरंजन आवडतं मात्र, इतके दिवस घरात राहिल्यानंतर आम्हाला सिनेमा बघायला हवा किंवा संगीत मैफिलीमध्ये जायला आवडेल. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो बंदिस्त जास्त काळ राहू शकत नाही” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील चित्रपट रिलीज, संगीत मैफिली, मैफिली रद्द करण्यात आल्या आहेत. भोसले पुढे बोलताना म्हणाल्या, “मी आयुष्यात टीबी, कॉलरा, प्लेग सारख्या अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. परंतु कोरोना विषाणूने भूतकाळाच्या कडू आठवणी परत आणल्या आहेत”.
त्यावेळी अशा वैद्यकीय सुविधादेखील नव्हत्या. आम्ही घरगुती उपचारांवर अवलंबून होतो.” जेव्हा प्लेगसारखा साथीचा आजार आला तेव्हा संपूर्ण गाव साफ व्हायचं. तेव्हा देखील सामाजिक अंतर ठेवावं लागायचं. “त्यावेळी सामाजिक अंतर किंवा लॉकडाउनसारखे कोणतेही काल्पनिक शब्द नव्हते, परंतु त्याच आधारावर आमचा बचाव करण्यात आला.” “कोरोना विषाणू खूप धोकादायक आहे. सोशल डिस्टंशिंग आणि स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. भारत सरकारने कोरोना विषाणूची गंभीर दाखल घेऊन, वेगवान पावले उचलली आहेत. नाहीतर आपलो लोकसंख्या पाहता गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती असं त्या म्हणाल्या.”