नवी दिल्ली – एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी अनेक वृत्तवाहिन्यांवर ज्ञानवापी मशिदीच्या विषयावर आपले म्हणणे मांडताना दिसत आहेत. अशातच ते टीव्ही 9 भारतवर्ष या टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात पोहोचले होते. यादरम्यान अँकरने त्यांना दुसर्या पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले तेव्हा ते नाव ऐकताच संतापले. त्यांनी शो सोडला आणि म्हणाले, तुम्ही फसवणूक करत आहेत.
वास्तविक, टीव्ही मुलाखतीदरम्यान अँकरने सांगितले की, आमचे सहकारी अभिषेक उपाध्याय वाराणसीच्या कोर्ट परिसरात दाखल झाले आहेत. त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पत्रकार अभिषेक उपाध्याय यांचे नाव ऐकताच असदुद्दीन ओवेसी भडकले. त्यांनी माईक काढून मी त्याच्यासोबत बसणार नाही, तुम्ही माझी फसवणूक करत आहात, असे सांगितले.
और नाम सुनते ही इंटरव्यू छोड़ दिया ओवैसी साहब ने। हालांकि शेक्सपियर लिख गए हैं, “नाम में क्या रखा है?”
What’s in a name? pic.twitter.com/7uPuG9YuPy— abhishek upadhyay (@upadhyayabhii) May 18, 2022
त्यानंतर अँकर ओवेसींना म्हणाले की, तो तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, तुम्ही माझ्याच प्रश्नांची उत्तरे द्या, पण अँकरचे म्हणणे ऐकण्यापूर्वीच ओवेसी शो सोडून गेले. शोचा हा व्हिडिओ शेअर करत अभिषेक उपाध्यायने लिहिले की, ‘आणि नाव ऐकताच मुलाखत सोडून गेले ओवेसी साहेब.. शेक्सपियरने लिहिले आहे,… नावात काय आहे?’
लोकांच्या प्रतिक्रिया –
आरती नावाच्या युजर्सने टिप्पणी केली आहे की, जेव्हा जेव्हा ज्ञानवापी शांती दूतांचा पर्दाफाश होण्याचा धोका असतो तेव्हा त्यांचा शेवटचा पर्याय असतो विक्टिम कार्ड, ओवेसी जी तेच करत आहेत.. मियाँ, आता हे कार्ड जीर्ण झाले आहे. ओरडत राहा. हिमांशू शर्मा नावाच्या युजरने लिहिले की, ‘ओवेसी साहेब योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अभिषेक उपाध्याय यांना जास्त घाबरतात. यामागे काय कारण आहे?’
गौरव नावाच्या युजरने लिहिले की, ‘हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावाले नाव ऐकूनच पळून जातात. भीती वाटते, भारत सुरक्षित नाही वाटत?. दिनेश चौधरी लिहितात, ‘नावच पुरेसे आहे.’ अपर्णा नावाच्या युजरने प्रश्न केला की, असदुद्दीन ओवेसींना ब्राह्मणांची इतकी भीती का वाटते?