Arvind Kejriwal । दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने (आप) पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बवाना स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर प्रस्ताव आहे. केंद्र सरकारचा हा प्रस्ताव ‘आप’ सरकारने फेटाळला आहे.
चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली बैठक अनिर्णित राहिल्यानंतर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आज आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीकडे कूच सुरू केली.
#WATCH | Police fire tear gas to disperse protesting farmers at Punjab-Haryana Shambhu border. pic.twitter.com/LNpKPqdTR4
— ANI (@ANI) February 13, 2024
केंद्राच्या प्रस्तावावर गृहमंत्री कैलाश गहलोत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,’शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहे.शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अटक करणे चुकीचे आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
देशातील शेतकरी हे आमचे अन्नदाता असून त्यांना अटक करून त्यांच्यावर अशी वागणूक देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ शिंपडण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही समर्थन करू शकत नाही, त्यामुळे कोणत्याही स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर करण्यास मान्यता देता येणार नाही.’ असेही ते म्हणाले आहे.