मुंबई – बॉलीवूड अभिनेता अभिनेता अर्शद वारसी हा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील ‘सर्किट’ या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. यातील त्याची स्टाइल, भाषा विशेष चर्चेत आली होती. मात्र ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटानंतर त्याचे करिअर संपले जाईल, अशी भीती त्याला वाटू लागली होती .
‘सर्किट’ या भूमिकेसाठी पहिल्यांदा मकरंद देशपांडे यांनाही विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत अर्शद वारसीने सांगितले की, हा चित्रपट माझा करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल, असे मला वाटले होते. या भूमिकेला मकरंद देशपांडेसारख्या कलाकारानेही नकार दिला होता, अशी ही एका गुंडाची भूमिका होती. त्यामुळे हा चित्रपट केल्यानंतर माझं आयुष्य बरबाद होणार आहे हे मला माहित होते.
पुढे तो म्हणाला की, “मला राजकुमार हिरानी एक माणूस आणि दिग्दर्शक म्हणून आवडतात. मला कथा आवडली होती, पण या चित्रपटातून मला काही मिळणार नाही हे मला माहीत होतं. कारण आजवरच्या चित्रपटात अशा प्रकारचे गुंड कुणीच पाहिले नव्हते. चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला तरी त्यातून मला काहीच मिळणार नव्हते. कारण आतापर्यंत चित्रपटात अशा प्रकारचे गुंड कुणी पाहिले नव्हते. संजय दत्तसुद्धा या चित्रपटाबाबत कॉन्फिडन्स नव्हता.”
मात्र या चित्रपटाने फक्त संजय दत्त याचे नाही तर अर्शद वारसीचेही आयुष्य बदलून गेले. या चित्रपटाने अर्शदला नवी ओळख मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. या चित्रपटाचा ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा दूसरा भाग देखील सुपरहिट ठरला होता. राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सध्या ते शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.