कोलोंबो- श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्यानंतर देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची सगळी सूत्रे अध्यक्षांनी आपल्या हातात घेतली आहेत. बंदोबस्तासाठी सुरक्षा रक्षकांची कुमक कमी पडू नये म्हणून लष्करातील रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
रजेवर गेलेल्या सैनिकांना तातडीने सेवेवर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. परदेशी कर्ज आणि देशव्यापी आंदोलनांमुळे शुक्रवारी श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. गेल्या पाच आठवड्यात श्रीलंकेत दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
आणीबाणी लागू केल्यापासून देशभरातील आंदोलन पुन्हा पेटले आहे. आंदोलकांनी कायदा मोडून पोलिलांच्या कामीात अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. सरक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने नागरिकांना राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जबाबदारीने आणि संयमाने वागण्याचे आवाहन केले आहे.