मुंबई – शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. ड्रमायन, त्यांच्यावरील कारवाईवर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. कारवाईवर बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही? भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू
भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का नाही?, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंवर याआधी चौकशी लावली. आता प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. शरद पवारांचीही चौकशी लावली, मग दानवे काय शुद्ध घी वाले आहेत काय? असं म्हणत भाजप नेत्यांना त्यांनी सवाल केला आहे.
तत्पूर्वी, या कारवाईवर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असे खोचक वक्तव्य केले होते.